शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी बैठकीत ईव्हीएमचा संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 23:12 IST

सांगली : महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्टÑवादीच्या सांगलीत झालेल्या बैठकीत रविवारी ईव्हीएमबद्दल (मतदान यंत्र) संशयकल्लोळ झाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच यंत्राबद्दलच्या तक्रारींचा पाऊस पडला. शेवटी एकमताने याबद्दल राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.विजय कॉलनीतील राष्टÑवादी कार्यालयात दुपारी राष्टÑवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. निवडून आलेल्या पक्षाच्या सदस्यांचा ...

सांगली : महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्टÑवादीच्या सांगलीत झालेल्या बैठकीत रविवारी ईव्हीएमबद्दल (मतदान यंत्र) संशयकल्लोळ झाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच यंत्राबद्दलच्या तक्रारींचा पाऊस पडला. शेवटी एकमताने याबद्दल राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.विजय कॉलनीतील राष्टÑवादी कार्यालयात दुपारी राष्टÑवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. निवडून आलेल्या पक्षाच्या सदस्यांचा सत्कार जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. बैठकीला पराभूत उमेदवार व त्यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. बैठकीत ७० टक्के पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्र, अधिकाऱ्यांकडून मिळालेली चुकीची वागणूक, यंत्रणेकडून झालेला त्रास याबद्दल तक्रारी मांडल्या. यावेळी माजी नगरसेविका प्रियांका बंडगर म्हणाल्या की, ज्या उमेदवारांना फारसे कुणी ओळखतही नाही, त्यांना हजारो मते कशी मिळू शकतात. आजवर पोस्टल मतांमध्ये जो कौल दिसतो, तोच मूळ निकालात दिसत असतो, असा अनुभव असताना, यावेळच्या निवडणुकीत पोस्टल मतांच्या कौलाविरुद्ध मूळ निकाल लागल्याचे दिसून येते. हा संशयास्पद प्रकार ईव्हीएममुळे झाला आहे. या यंत्रांनी सामान्य उमेदवारांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे संशयाच्या भोवºयात सापडलेल्या या यंत्रांना हद्दपार करावे.संतोष सुर्वे म्हणाले की, प्रभाग क्र. ३ मध्ये निकालापूर्वीच फटाक्यांची आतषबाजी झाली होती. यंत्रांच्या तपासणीबाबत आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली गेली नाही. यंत्र सील होण्यापूर्वी राष्टÑवादी कार्यकर्त्यांना हाकलले गेले. संपूर्ण यंत्रणाच चुकीच्या पद्धतीने काम करीत असल्याचा संशय आम्हाला असूनही आम्ही काही करू शकलो नाही. प्रचंड दबाव शासकीय यंत्रणेवर असल्याचे आम्हाला जाणवत होते. त्यामुळे या यंत्रांची तसेच एकूणच यंत्रणेची चौकशी आयोगाने करायला हवी. एका कार्यकर्त्याने प्रभाग १२ मध्ये बाहेरील प्रभागातून आलेल्या नसिमा शेख यांना मिळालेल्या मतांकडे लक्ष वेधले. ज्या उमेदवारांना लोक ओळखतही नव्हते, त्यांच्या पदरात इतकी मते आलीच कुठून?, असा सवाल उपस्थित केला. अनेक प्रभागातील लोकसुद्धा या निकालाने अवाक् झाले आहेत. त्यांच्या मनातसुद्धा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे ही यंत्रणा बदलण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. पहिल्या अनेक फेºयांमध्ये आघाडीवर असलेल्या उमेदवारांना शेवटच्या तीन फेºयांमध्ये अचानक कशी मते वाढतात?, असा सवालही उपस्थित केला. बैठकीस माजी महापौर सुरेश पाटील, इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान, कमलाकर पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, विनया पाठक, धनपाल खोत आदी उपस्थित होते.आयोगाकडे तक्रार करणार!राष्टÑवादीचे सर्वच नगरसेवक व पराभूत उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम यंत्राबद्दल तसेच एकूण यंत्रणेबद्दल तक्रार करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात व्हीव्हीपॅट किंवा मतपत्रिकांचा वापर निवडणूक आयोगाने याठिकाणी करावा, अशी मागणीही करण्यात येणार आहे. संशयास्पद वाटणाºया निकालांविषयी अपील दाखल करून शक्य तिथंपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. येत्या सोमवारीच तातडीने याबाबतचे पत्र तयार करून त्यावर सर्वांच्या एकत्रित स्वाक्षºया घेऊन तक्रार करण्यात येणार आहे.